*ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध**ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास**ओबीसी मुला-मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन**चंद्रपूर, बेकिंग......................,... माय भुमि न्युज, प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर........दि.१८ - आज ओबीसींसाठी वसतीगृह स्थापन होत आहेत. पण पूर्वी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माझी चर्चा झाली. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असायला हवे, यावर शिक्कामोर्तब झाले. फाईल स्वाक्षरीसाठी माझ्याकडे आली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता स्वाक्षरी केली. आणि ९ मार्च २०१७ ला महाराष्ट्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले. ओबीसींच्या कल्याणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.* ओबीसीं मुला-मुलींच्या वसतीगृहांचे उद्घाटन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दीड ते दोन वर्षांत अतिशय सुंदर ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतीगृह तयार होतील. नाशिकच्या धरतीवर डिझाईन तयार केले आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे अॅड. पुरुषोत्तम सातपुते, भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे, सहायक आयुक्त श्रीमती कवाडे, अरुण तिखे, विलास माथनकर,प्रा. अनिल डहाके, गोमती पाचभाई, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजूरकर, संदीप आवारी, पुरुषोत्तम सहारे, सुर्यकांत खनके, उमेश कोराम, सुभाष कासमगोट्टुवार, अजय सरकार, सविता कांबळे, श्रुती गवारे, शिला चव्हाण, शितल गुरनुले, वनिता डुकरे यांची उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणणे, अफजलखानाच्या कबरीचे अतीक्रमण हटवणे किंवा भवानी मातेसाठी रत्नजडीत छत्र उभे करणे असेल, मला ही कामे करता आली, हे माझं भाग्य आहे. रायगडावर आता दरवर्षी राज्य सरकारच्याच वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव बदलण्याची इच्छा वारंवार मांडली होती. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी ही मागणी मान्य करून छत्रपती संभाजीनगर असे नाव केले. त्यात माझाही खारीचा वाटा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये लंडन येथे ज्या घरी शिक्षणासाठी मुक्कामाला होते, त्या घराला स्मारक करण्याची संकल्पना पुढे आली. त्या फाईलवर स्वाक्षरी करण्याचे भाग्य देवेंद्रजींसोबत मलाही लाभले, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात असा प्रयत्न आहे. मी १६ मार्च १९९५ मध्ये आमदार झाल्याबरोबर पहिली घोषणा वाचनालयाची केली होती. आज चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा येथील दिड हजार विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेत आहेत. मुंबईत एखादा पीएसआय किंवा विभागाचा अधिकारी भेटतो. तो अभिमानाने सांगतो की आपण सुरू केलेल्या वाचनालयात अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालो आणि इथेपर्यंत पोहोचू शकलो. माझेही मन आनंदाने भरून येते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. स्व. बाबा आमटे यांच्या सेवाकार्याची दखल म्हणून शासनातर्फे डाक तिकीट प्रकाशित केले. पण त्यांच्या स्मृती जपण्यासाठी उत्तम अभ्यासिका आवश्यक आहे असे मला वाटले. आज स्व. बाबा आमटे अभ्यासिका अनेक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा आयपीएस-आयएएसचा टक्का वाढला पाहिजे, असे मला सातत्याने वाटायचे. मी याकडे सभागृहात लक्ष वेधले. त्यानंतर ठराव झाला आणि समिती तयार झाली. आता महाराष्ट्राचा टक्का वाढला. ट्रेनिंग सेंटर अत्याधुनिक झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढवली, हे सांगतानाच ना. श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात ३०० ओबीसी विद्यार्थ्यांना आणि ३०० ओबीसी विद्यार्थिनींना आधार योजना देण्याचा निर्णय केल्याची माहितीही दिली. *त्यांना तुरुंगात टाकू*व्यावसायिक शिक्षण घ्यायचे असेल तर ५० टक्के शुल्क सवलत होती. आता ओबीसी मुलींना १०० टक्के शुल्क सवलत केली. इडब्ल्यूएसमध्ये देखील १०० टक्के सवलत केली आहे. काही व्यवस्थापनांनी यात खोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा संस्थांच्या प्रमुखांना तुरुंगात टाकले पाहिजे. कारण ते राज्याच्या योजना बदनाम करत आहेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. *आर्थिक स्थिती बळकट*बहिणींना विश्वासाने सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याच्या तिजोरीवर या योजनेचा मुळीच भार नाही. मी अर्थमंत्री असताना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राज्याचा महसूल ११ हजार ९७५ कोटी रुपयांनी सरप्लस केला होता. आपली आर्थिक स्थिती बळकट आहे. आपण शेवटच्या व्यक्तीच्या प्रगतीसाठी काम करण्याचा उद्देश पुढे ठेवला आहे. कुणीही वंचित राहू नये असा आपला प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. *चंद्रपूरच्या शैक्षणिक प्रगतीसाठी…*चंद्रपूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात वेगाने पुढे जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. चंद्रपूर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये श्री.रतन टाटांकडून २६३ कोटी रुपये आणले आहेत. अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत अशी व्यवस्था असेल. एसएनडीटी विद्यापीठ परिसर तयार होत आहे. यात सर्व जातींच्या हजारो मुलींसाठी ६२ अभ्यासक्रम आणले आहेत. चंद्रपूरमधील मुलं देखील व्यावसायिक पायलटचं प्रशिक्षण घेऊ शकतील. मोरवा एअरपोर्टमध्ये फ्लाईंग क्लब लवकरच सुरू होणार आहे. ओबीसी, आदिवासी मुलामुलींना त्याचा लाभ मिळणार आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. *श्रुती गवारे विध्यार्थिंनीने मानले आभार*श्रुती गव्हारे विध्यार्थिंनीने आपलें मनोगत व्यक्त करीत एक सुंदर कविता सादर केली. ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु केल्याबद्दल ना. मुनगंटीवार यांचे कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306 जिल्हा प्रतिनिधी, विश्वनाथ झाडे चंद्रपूर मो नंबर 7620575127

Popular posts from this blog

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथील घटना..मुलाने केला वडिलांचा खून असे पोलिसांच्या तपासातूनआले समोर..जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात खूनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही खामगाव तसेच..खामगाव तालुक्यातील लोणी गुरु येथील घटना मुलानेच बापाला संपविले काळीमा फासणारी घटना जन्मदात्या आई-वडिलांचा खून करायला भीत नाही म्हटलं तर बाकी या जगात काहीच सत्य नाही एवढं मात्र खरं खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे 30 एप्रिल च्या सकाळी ही घटना उघड झाली गौरव घेवराळे यांच्या अंगावर असलेल्या भावावरून प्रथमदर्शी निर्गुण खून करण्यात आल्याचे समोर आले पोटच्या मुलाने जोडलांचा खून केल्याचे पुरुषांच्या तपासात समोर आले आहे खामगाव तालुक्यातील मूळ बोताकाजी येथील रहिवासी गौरव हिवराळे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या सासरी लोणीगुरू येथे राहत होते याच दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू देव होता का जिथे त्यांच्या घरात आढळला या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात तिघांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली मुलानेच बापाचा खून केला असे समोर आले आहे महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा मुख्य संपादक.... गजानन धंदरे बुलढाणा मोबाईल नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये दोन गटात हाणामारी....फिर्यादी तर्फे... पोहे का विठ्ठल चव्हाण वन नंबर 1240 पोलीस स्टेशन तालुका खामगाव कलमी अपराध क्रमांक 82/2025 कलम 109, 118 (१) 132, 121, (१) 223, 189 (२) 192 (२) 191 (३) 190, 352 351 (२)(३) भारतीय न्यायदा प्रमाणे २०२३ कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल आरोपी , (१)निवृत्ती परसराम राऊत (२) सागर मनोहर फुंडकर (३) प्रफुल वैजनाथ पारस्कर (४) रितेश ज्ञानदेव कडाळे (५) राजू पांडुरंग बावणे (६) ज्ञानेश्वर रामकृष्ण बोंबटकार (७) समाधान परसराम महाले (८) अमोल महादेव चोपडे (९) विशाल गोटीराम पवार (१०) पांडुरंग विठ्ठल बाराते (११) विश्वनाथ महादेव भटकर (१२) संजय पंढरी ठाकरे (१३) सतीश वासुदेव खंडारे (१४) मुकिंदा रमेश फुंडकर (१५) राजेश गंगाधर भारसाकडे (१६) कृती श्रीकृष्ण धनोकार (१७) महेंद्र किसन शिंदे (१८) सार्थक रमेश गवई (१९) आश्विन अरुण वाकोडे (२०) गोपाल उत्तम मोरे (२१) सिद्धार्थ दादाराव गवई (२२) निलेश बाबुराव गव ई(२३) साहेबराव भीमराव गव ई(२४) जोगेंद्र यशवंत वाकोडे (२५) मोहन समाधान वानखेडे (२६) विकास प्रकाश गवई (२८) भीमराव त्रंबक गवई (२९) संघपाल संभाजी गवई (३०) विजय कैलास आराख (३१) मुकिंदा यशवंत गवई (३२) रविराज भगवान आराख (३३) राजू बाबुराव गवई (३४) निलेश गवई या सर्व आरोपीला 335 मपोका कलम गुन्हे दाखल करण्यात आले व आरोपी जेरबंद करण्यात आले हिवरखेड गावातील बौद्ध समाजाची लोकांनी दिनांक 13 4 2025 रोजी रात्री इलेक्ट्रिक लाईट बंद करून इलेक्ट्रिक पोल वर निळे झेंडे लावले त्यानंतर दिनांक 14 /4 /2014 रोजी हिंदू समाज लोकांनी सकाळी आपले दुकाने सर्व बंद ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना अचानक इलेक्ट्रॉनिक लाईट बंद झाले तसेच गावातील हिंदू समाजाच्या लोकांनी सालावादाप्रमाणे सहभाग न घेतल्याने दोन्ही समाजातील लोकांमध्ये नाराजी निर्माण झालेली होती गुण्याच्या नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी निर्माण करून हिंदू कुणबी व बौद्ध समाजातील लोकांनी लाट्या-काठ्या लोखंडी पाईप कुराळ दगड विटा असे प्राण घातक शस्त्र घेऊन एकमेकांच्या समोरासमोर येऊन एकमेकांना मादरचोत हरामखोर अशा शिव्या गाळा केल्या व एकमेकांना दगड विटा फेकून मारत होते जितेंद्र किसन शिंदे या जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागर मनोहर फुंडकर यांनी दगड मारून जखमी केले तसेच महेंद्र किसन शिंदे यांनी गौरव फुंडकर यास ठार मारण्याचे उद्देशाने दगड मारला त्यामुळे त्यांचे फोटोवर मुक्का मार लागला त्यावेळी दगडफेकी मध्ये जितेंद्र किसन शिंदे सुरेश सारंग सावंग पांडुरंग बाराते गौरव फुंडकर असे जखमी झाले पोलीस स्टॉप असे दोन्ही समाजाचे लोकांना सोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी पिराजी व पोलीस स्टफला लोटा पाठ करून धक्काबुक्की करून फिर्यादी पोलीस स्टफ करीत असलेल्या शासकीय कर्तव्य मध्ये अडथळा निर्माण केला जिल्हाधिकारी साहेब यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लगन झाल्याप्रमाणे रिपोर्ट वरून अपराध दाखल करण्यात आला अधिकारी... श्री विश्व पानसरे माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री श्रेणिक लोढा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री बी बी महामुनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री प्रदीप पाटील उपविभागी पोलीस अधिकारी मेहकर, प्रभाग खामगाव श्री सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा ठाणेदार कैलास चौधरी... यांनी यावेळी चोको बंदोबस लावला कर्फ्यू नियंत्रण ठेवला...महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾धन्यवाद

ब्रेकिंग..... माय भुमि न्युज वर.... सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या रास्त न्याय मागण्या... खामगाव तालुक्यातील शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने खामगाव नगर परिषदेतील सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या राष्ट्र न्याय मागण्या..(१) खामगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन 400 सफाई कामगार भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावे जर पाठवलेले असतील तर प्रस्तावाची नक्कल साक्षात प्रत संघटनेला द्यावी (२) सफाई कामगारांना कचरा गाडी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे (३) शासन आदेशानुसार खामगाव शहरातील सर्व सफाई कामगारांचे राहते घरी नमुना ड आठ अ नावे करण्यात यावे प्रत्येक सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून 30 बाय 50 चे प्लॉट वाटप करण्यात यावे (४) सफाई कामगार पुरुष महिला यांना प्रत्येकी दोन ड्रेस चप्पल गम बूट देण्यात यावे (५) सर्व सफाई कामगारांना रक्षाबंधनापूर्वी पगार व पेन्शन देणे द्यावे तसेच घंटागाडी कामगारांना पगार देण्याचे आदेश कंत्रा दारास घ्यावे (६) सफाई कामगारांना साफसफाईची कामासाठी लागणारे सर्व साहित्य त्वरित देणे द्यावी (७) सेवा नियुक्त मयत सफाई कामगारांचे वारसांना नामनिर्देशातील व्यक्तींना शासन निर्णय प्रमाणे वारसा हक्काचे त्वरित सेवेत समावून करण्यात यावे (८) शासन नियमाप्रमाणे सूची सेवा नियुक्ती मागण्या आला सफाई कामगारांना वेदकीय प्रभागाची अट न घालता सोयीच्या सेवा नियुक्ती कालावधीत नियमाप्रमाणे देण्यात यावी (९) सर्व सफाई कामगारांना श्री गोगानवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे अग्रेस रक्कम दहा हजारा देण्यात यावी(१०) शासन आदेशानुसार सफाई कामगारांना सर्व शासकीय सुट्ट्या विना नीलम न लागू करण्यात याव्या शासकीय सुट्ट्या त्या दिवशी कामे केलेल्या दिवसांचा मोबदल्याची शासन निर्णय निघल्यापासूनची थकीत रक्कम त्वरित अदा करणे द्यावी (११) नगरपरिषद खामगाव तर्फे कृषी उत्पन्न लॉन्स मध्ये मेतर समाजाचे इष्टदेव श्री गोगाजी महाराजांची गुगामेंडी पासून जन्मोत्सव निमित्त जागा उपलब्ध करून देऊन मंदिर बांधून देण्यात यावे याकरिता निवेदन सादर याच अनुषंगाने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने शिवराज्य सफाई संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश कबीरदासजी गहलोत (राजपूत) तसेच शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे सचिव.... शंभू नंदलालजी शर्मा यांनी यावेळी आपले पदाधिकारी घेऊन व पदाधिकाऱ्यांच्या विश्वास टाकून सदर सूचना सांगून या संघटनेच्या वतीने माननीय मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद खामगाव यांना देण्यात आले प्रतिलिपी...मा मुख्यमंत्री महाराष्ट्र मंत्रालय मुंबई. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, माननीय आकाश दादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगाव मतदार संघ महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय संचालक नगर विकास विभाग संचालक मुंबई, माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मंत्रालय मुंबई 32, माननीय विभागीय आयुक्त तथा नगरपालिका प्रशासन प्रादेशिक विभाग अमरावती, माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी खामगाव, माननीय संपादक माय भूमी न्यूज नेटवर्क खामगाव बुलढाणा.... महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा... मुख्य संपादक गजानन धंदरे बुलढाणा मो नंबर 9850835306